Tuesday 9 February 2016

संत तुकाराम

===========Ⓜ🅰🅿=====
     🔘ओळख थोर व्यक्तींची🔘
               🍃भाग - ५१🍃
=======================

                🌹संत तुकाराम🌹

🌸मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

🌸जन्म इ.स. १५९८ देहू, महाराष्ट्र

🌸निर्वाण इ.स. १६५० देहू, महाराष्ट्र

🌸संप्रदाय वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय

🌸साहित्यरचना तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)

🌸कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

🌸संबंधित तीर्थक्षेत्रे देहू

🌸वडील बोल्होबा अंबिले

🌸आई कनकाई

🌸पत्नी आवळाबाई/आवडा)

🌸अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

🔶संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा, तुका, तुक्या) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते.

🔶पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता.

🔶तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात.

🔶तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते.

🔶विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला.

🔶‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली.

🔶संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत.

🔷‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात.

🔷‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते.

🔷विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.

🔷‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले,
🔷जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले.

🔷देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते.

🔷सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

🌸जीवन

🍀तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत.

🍀त्यांचे घराणे मोरे क्षत्रिय आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते.

🍀त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता.

🍀घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

🍀तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली.

🍀ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला.

🍀भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली.

🍀या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली.

🍀 तुकारांमांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली.

🍀पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

🍀सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले.

🍀देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला.

🍀पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.

🍀फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे निधन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.

🌸तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

📗 ’तुकारामबाबांचे चरित्र’ -कृष्णाजी अर्जुन केळूसकर
📗आनंदओवरी (कादंबरी - लेखक दि.बा. मोकाशी) आनंड डोह (२०१४). 
📗आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी) 📗तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर)
📗तुका झालासे कळस (चित्रपट, १९६४) - दिग्दर्शक राजा नेने.
📗तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर
📗तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे
📗तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे
📗तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश
📗तुका झाले कळस (व.दि. कुलकर्णी)
📗तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
📗तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
📗तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
📗तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
📗तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
📗तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
📗तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे) 📗समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
📗तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ

📚तुकारामांनी लिहिलेली पुस्तके

📒गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे.

तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.

📓तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
📓तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे) 📓दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
📓श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगा

No comments:

Post a Comment