Sunday 27 March 2016

U tube channels

📱📲🖌♍🅰🅿📱📲🖌

यु-ट्यूब वर असंख्य शैक्षणिक व्हिडिओस आहेत.सध्या अनेक शिक्षक व तज्ञ व्यक्तींद्वारे अश्या व्हिडिओस चे चॅनेल ही दररोज अपडेट होत आहेत आहेत.त्यातील काही महत्वाचे शैक्षणिक चॅनेल्स शिक्षकांकरिता पालघर तंत्रस्नेहींकडून सादर चॅनेल्स subscribe करा व असंख्य व्हिडिओस चा खजिना मुलांसाठी उपलब्ध करून द्या.

⚗YouTube Channels for Science Teachers

🔬Make Me Genius

🔬Naked Science

🔬Brain Stuff

🔬MonkeySee

🔬Periodic Videos

📏YouTube Channels for Math Teachers

🎚Mr. Robb’s Math Videos

🎚Ten Marks

🎚Mathademics

🎚Khan Academy

🎚The Video Math Tutor

🎚Numberphile

🎚PatrickJMT Free Math Videos

🎚Mathematics Online

🎚Your Teacher

🎚Mathcasts

🎚WOWmath

🎚YayMath

⚗YouTube Channels for Chemistry and Physics Teachers

🔬Institute of Physics

🔬The Fuse School

🔬Crash Course

🔬MinutePhysics

🔬Periodic Videos

📧YouTube Channels for Learning English

🖍BBC Learning English

🖍Learn American English Online

🖍Speak English with Misterduncan

🖍Learn English with Let's Talk

🖍Jennifer ESL

🗺YouTube Channels for Educational Documentaries

📽National Geographic

📽Documentary Films

📽HD Documentary Channel

📽The Documentary Network

📽Documentary

📽History TV

🖌YouTube Channels That Provide Intelligent Content for Students

🖌Crash Course

🖌Minute Physics

🖌Smarter Every Day

🖌SciShow

🎙technology for teachers

🎙आनंद आनेमवाड
🖌पालघर तंत्रस्नेही शिक्षक गट

📞9890697966

📱📲📱📲📱📲📱📲📱📲📱

पेन ड्राइव ला (RAM) रँम बनवा.
पेनड्राइव को बना सकते हैं रैम. आज मैं आपके लिए एक
ऐसी जानकारी लेकर आया हूं जिसको जानकर
आपकी खुशी का ठिकाना नहीं रहेगा। ये एक
ऐसी जानकारी है जिसका नॉलेज बहुतही कम
लोगों कोहोता है। क्या आपको पता है कि जनरल उपयोग में
आने वाले Pendrive को कम्प्यूटर में RAM (flash drive) की तरह
उपयोग में लिया जा सकता है। ये
तो आपको पता ही होगा कि कम्प्यूटर की स्पीड सबसे
ज्यादाउसमें लगाई जाने वाली RAM की क्षमता पर निर्भर
करती है यदि हमारे कम्प्यूटर में RAM की साइज बहुत ही कम है
तोहमारा कम्प्यूटर धीरे चलेगा। ऐसी स्थिति में यदि हम
एक्स्ट्रा RAM खरीदेंगे तो कम से कम 1000 से1500 रूपये तक
खर्च हो जाएंगे लकिन अगर आप अपने Pendrive को RAM
बनाना जानते हो तो आपका ये काम बहुत आसान
हो जाएगा।आओ जानते है कि कैसे बनाया जाता है पेनड्राइव
को रेम

1. सबसे पहले अपने Computer के USBपोर्ट में अपनी pen
drive लगाइये ! (पेनड्राइव कम से कम 2
जीबी का होतो अच्छा रहेगा)

2. अब MyComputer के आइकन
पर जाकरRight click कीजिये। और Properties विकल्प पर
क्लिक कीजिये।

3. एक विण्डो ओपन होगी इसमें Advanced
System Settings पर क्लिक करें। (यदि आप विण्डोज xp यूज
करते हैं तो Advanced tab पर क्लिककरनाहोगा)

4. अब Advance Tab पर क्लिक कर Settings बटन पर क्लिक कीजिये।

5. Performance Option विण्डो खुलेगी जिसमेंAdvanced tab
पर क्लिक कीजिये। और Virtual memory केअन्दर दिये गए
Change बटन पर क्लिक कीजिये।

6. तब एक
विण्डो खुलेगी जिसमें Automatically manage paging file
size for all drives पर टिक (चैकमार्क) अगरलग रहा हो तो इसे
हटा दीजिये। अब अपनी pendrive को दी गयी लिस्ट मेंसे
सलैक्ट कीजिये। (जैसे कि मैंने अपनी पैनड्राइव को चुना है) अब
custom size पर क्लिक कीजियेऔर वैल्यू दीजिए
जो कि आपकी pendrive के खाली स्पेस के अनुसार दे सकते

हो।अब सैट बटन पर क्लिक करके ओके बटन पर क्लिक करें।
आपको एक मैसेज प्राप्त होगा जिसमें ओके पर क्लिक करें।अब
एक मैसेज और प्रस्तुत होगा जिसमें RestartNow बटन पर क्लिक
करें।।।अब आपका कम्प्यूटर जब पुन: चालू  
होगा तो आपका पेनड्राइव रेम की तरह काम करेगा और
सिस्टम की स्पीड में बहुत ज्यादा फर्क देखने को मिलेगा।

Note -ध्यान रहे कम्प्यूटर जब रिस्टार्ट
हो रहा हो तो पेनड्राइव कम्प्यूटर में लगा हुआ होना जरूरी है।

Copy paste

Wednesday 23 March 2016

🙏🙏🙏🙏joshi. m.b🙏🙏🙏🙏
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
      
          💐नगर पॅटर्न💐

🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯कॉम्प्युटरच्या या काही ट्रिक्स आपल्या करतील पॉवर युजर🎯

मुंबई : कॉम्प्युटर आपल्या जीवनातील एक हिस्सा झालाय. संगणकावर काम करताना काही निरुपयोगी गोष्टी आपला वेळ खातात. तसेच कामात बाधा आणतात. त्यामुळे तुम्ही या काही ट्रिक्स आपल्यापॉवर युजर करतील.

सध्या कॉम्प्युटरचा वापर जवळपास प्रत्येक घरात करण्यात येत आहे. मात्र, काहींना आपला संगणक कसा हाताळायचा याची माहिती नसते. मात्र, या ट्रिक्स वापरल्यात तर तुम्ही स्मार्ट व्हाल आणि तुमचा वेळ वाचेल.

अधिक वाचा
कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
पाहा काय आहेत या ट्रिक्स :
१. तुम्ही दोन विंडोजचा वापर करणार असाल तर आपल्या किबोर्डवर विंडो बटन आहे. त्या बटनाला राईट आणि लेफ्टे अॅरोबरोबर प्रेस करा. दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र येतील.

२. काम करताना चुकून कॉम्प्युटर बंद झाला तर
ctrl+shift+T टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.

३. स्पेस बारची कमाल. ज्यावेळी कोणत्याही ब्राऊझरमध्ये ब्राऊझिंग करत असाल तर खाली जाण्यासाठी स्पेस बारचा उपयोग करा आणि वरती जाण्यासाठी Shift की बरोबर स्पेस बारला प्रेस करा.

अधिक वाचा
किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा!
४. तुम्ही एखादी खासगी गोष्टी सर्च करीत असाल आणि तुमची URL आपल्या कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये नको असेल तर तुम्ही ctrl+shift+N टाईप करा. असं केल्यानंतर तुमच्या हिस्ट्रीमध्ये काहीही सेव्ह होणार नाही.

५. आपल्या कॉम्प्युटरची बॅटरी सेव्ह करण्यासाठी तुम्ही बॅटरी सेव्हिंग मोड ऑन करु शकता. तसेच आपल्या संगणकाचा डिस्प्ले डिम करु शकता. त्यामुळे बॅटरी सेव्ह होते.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯अँड्रॉईड फोनमध्ये या ५ गोष्टी करू नका🎯

मुंबई : अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी काय केले पाहिजे, याची माहिती करून घेणे जरूरीचे आहे. यासाठी या खालील पाच गोष्टी महत्वाच्या आहेत.

ज्या अॅपविषयी आपण ऐकलं नसेल, असे अॅप डाऊनलोड करू नका. तुम्हाला जास्तच जास्त कामाचे असतील तेच डाऊनलोड करा.

सुरूवातीलाच बॅटरी बुस्टर अॅपचा वापर करण्यापासून दूर रहा, त्याचा कोणताही फायदा होत नाही.

फोनच्या कॉन्टॅक्टसमध्ये कॉल सेव्ह करू नका, त्याचा बॅकअप बनवा, गुगल अकाऊंटला सर्व कॉन्टॅक्टस बॅकअप बनवू शकतात.

बॅटरीचं लाईफ वाढण्यासाठी नको असलेले अॅप लगेच बंद करा.

फोन जर तापत असेल तर किती अॅप सुरू आहेत ते पाहा आणि लगेच बंद करा.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

🎯चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा🎯

मुंबई : व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

व्हॉटस अॅप लॉक करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन कीप प्रायव्हसी अॅप इन्स्टॉल करा.

हा अॅप तुमच्याकडून चार अंकी नंबर मागेल, तो तुमचा पासवर्ड असेल, तो कन्फर्म करा.

तुम्ही ठरवलेला पासवर्ड पिन व्हॉटस अॅप प्रोटेक्ट करेल.

आता जो कुणी व्हॉटसअॅप ओपन करण्याचा प्रयत्न करेल, त्याला हा पिन टाकावा लागेल.

चुकीचा पिन टाकला तर त्या व्यक्तीचा फोटो फोनमध्ये सेव्ह होईल.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲
🎯पाण्यात पडलेला मोबाईल वाळवण्याच्या पाच टिप्स🎯

मुंबई : अनेकदा मोबाईल फोन पाण्यात पडल्यावर खराब होतो. त्यामुळे बरेच जण आपापल्या पद्धतीने फोन कोरडा करण्याच्या पद्धती अवलंबतात. काही जण फोन ओव्हनमध्ये वाळवतात तर काही हीटरवर फोन ठेवतात. पण या पद्धतीने तुमचा फोन खराब होऊ शकतो.
जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला तर काळजी करु नका. भिजलेला मोबाईल फोन वाळवण्याच्या पाच सोप्या टिप्स देत आहोत, जेणेकरुन तुमचा फोन खराब होणार नाही.
1. जर मोबाईल फोन भिजला असेल तर तातडीने त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.
2. फोनच्या अक्ससरीज वेगळं केल्यानंतर फोनचे इतर पार्ट्स वाळवणं गरजेचं आहे. यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

3. भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांड सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

4. तांदळाच्या भांड्यात मोबाईल ठेवायचा नसेल तर सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

5. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
हे करणं टाळा:

ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
Joshi.m.b
ता.शेवगाव जि.अहमदनगर
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

📳📳📳📳📳📳📳📳📳

Android mobile साठी PC suite

सध्या हे एक Android युग आहे. Samsung ने सुरवात केलेले Android mobile आता Micromax, Karbon, Lava यासारख्या कंपन्या देखील मार्केट मध्ये पर्यायाने स्वस्त असे मोबाईल आणले आहेत. पण यासोबत एक अडचण आहे, आणि ती म्हणजे यासोबत pc suite येत नाही. महत्वाचे कॉन्टॅक्स्बॅकअप घेण्यासाठी आणि एका मोबाईल मधील बॅकअप दुस-या मोबाईल मध्ये transfer करण्यासाठी pc suite हे महत्वाची भुमिका करतात. पण जर आपण विकत घेतलेल्या मोबाईल सोबत pc suite नसेल तर?

याकरीता येथे इंटरनेटवर उपलब्ध असलेले काही pc suite बघणार आहोत.

1) Mobiledit:

Mobiledit हा Android, iPhone, Blackberry, Windows Phone, Bada, Symbian आणि Meego यापैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करतो.यात पुढील वैशिष्टये आहेत.

यात कॉन्टॅक्टस्मोबाईल आणि पिसी मध्ये जलद transfer करता येतात.

MOBILedit मध्ये documents, photos, videos आणि music pc आणि मोबाईल मध्ये drag & drop करता येतात.

यात मोबाईलचा backup आणि restore सहज करता येतो. तसेच इंटरनेटवर cloud च्या आधारे backup घेता येतो.

Duplicate contacts काढून टाकता येतात.

एका मोबाईलमधील डाटा दुस-या मोबाईलमध्ये transfer करता येतो.

Pc suite मधून टेक्स्ट मॅसेज पाठविता येतात.

Mobiedit चे lite version हे फ्रि मध्ये डाऊनलोड करता येते, पण यात काही मर्यादा आहेत.

http://www.mobiledit.com

2) Mobisynapse:

हे अजून एक Android मोबाईल साठी pc suite आहे. यात सुध्दा backup, restore, Directly sync Outlook contacts, calendars, tasks आणि notes यासारख्या सुविधा आहेत. पण यात तुम्हाला .csv किंवा vcard format मध्ये contact export करता येत नाहीत. तसचे हा फ्रि नाही.

Tuesday 22 March 2016

🙏🙏🙏🙏joshi. m.b🙏🙏🙏🙏
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
      
          💐नगर पॅटर्न💐

🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯कॉम्प्युटरच्या या काही ट्रिक्स आपल्या करतील पॉवर युजर🎯

मुंबई : कॉम्प्युटर आपल्या जीवनातील एक हिस्सा झालाय. संगणकावर काम करताना काही निरुपयोगी गोष्टी आपला वेळ खातात. तसेच कामात बाधा आणतात. त्यामुळे तुम्ही या काही ट्रिक्स आपल्यापॉवर युजर करतील.

सध्या कॉम्प्युटरचा वापर जवळपास प्रत्येक घरात करण्यात येत आहे. मात्र, काहींना आपला संगणक कसा हाताळायचा याची माहिती नसते. मात्र, या ट्रिक्स वापरल्यात तर तुम्ही स्मार्ट व्हाल आणि तुमचा वेळ वाचेल.

अधिक वाचा
कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
पाहा काय आहेत या ट्रिक्स :
१. तुम्ही दोन विंडोजचा वापर करणार असाल तर आपल्या किबोर्डवर विंडो बटन आहे. त्या बटनाला राईट आणि लेफ्टे अॅरोबरोबर प्रेस करा. दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र येतील.

२. काम करताना चुकून कॉम्प्युटर बंद झाला तर
ctrl+shift+T टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.

३. स्पेस बारची कमाल. ज्यावेळी कोणत्याही ब्राऊझरमध्ये ब्राऊझिंग करत असाल तर खाली जाण्यासाठी स्पेस बारचा उपयोग करा आणि वरती जाण्यासाठी Shift की बरोबर स्पेस बारला प्रेस करा.

अधिक वाचा
किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा!
४. तुम्ही एखादी खासगी गोष्टी सर्च करीत असाल आणि तुमची URL आपल्या कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये नको असेल तर तुम्ही ctrl+shift+N टाईप करा. असं केल्यानंतर तुमच्या हिस्ट्रीमध्ये काहीही सेव्ह होणार नाही.

५. आपल्या कॉम्प्युटरची बॅटरी सेव्ह करण्यासाठी तुम्ही बॅटरी सेव्हिंग मोड ऑन करु शकता. तसेच आपल्या संगणकाचा डिस्प्ले डिम करु शकता. त्यामुळे बॅटरी सेव्ह होते.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🎯अँड्रॉईड फोनमध्ये या ५ गोष्टी करू नका🎯

मुंबई : अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी काय केले पाहिजे, याची माहिती करून घेणे जरूरीचे आहे. यासाठी या खालील पाच गोष्टी महत्वाच्या आहेत.

ज्या अॅपविषयी आपण ऐकलं नसेल, असे अॅप डाऊनलोड करू नका. तुम्हाला जास्तच जास्त कामाचे असतील तेच डाऊनलोड करा.

सुरूवातीलाच बॅटरी बुस्टर अॅपचा वापर करण्यापासून दूर रहा, त्याचा कोणताही फायदा होत नाही.

फोनच्या कॉन्टॅक्टसमध्ये कॉल सेव्ह करू नका, त्याचा बॅकअप बनवा, गुगल अकाऊंटला सर्व कॉन्टॅक्टस बॅकअप बनवू शकतात.

बॅटरीचं लाईफ वाढण्यासाठी नको असलेले अॅप लगेच बंद करा.

फोन जर तापत असेल तर किती अॅप सुरू आहेत ते पाहा आणि लगेच बंद करा.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

🎯चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा🎯

मुंबई : व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

व्हॉटस अॅप लॉक करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन कीप प्रायव्हसी अॅप इन्स्टॉल करा.

हा अॅप तुमच्याकडून चार अंकी नंबर मागेल, तो तुमचा पासवर्ड असेल, तो कन्फर्म करा.

तुम्ही ठरवलेला पासवर्ड पिन व्हॉटस अॅप प्रोटेक्ट करेल.

आता जो कुणी व्हॉटसअॅप ओपन करण्याचा प्रयत्न करेल, त्याला हा पिन टाकावा लागेल.

चुकीचा पिन टाकला तर त्या व्यक्तीचा फोटो फोनमध्ये सेव्ह होईल.
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲
🎯पाण्यात पडलेला मोबाईल वाळवण्याच्या पाच टिप्स🎯

मुंबई : अनेकदा मोबाईल फोन पाण्यात पडल्यावर खराब होतो. त्यामुळे बरेच जण आपापल्या पद्धतीने फोन कोरडा करण्याच्या पद्धती अवलंबतात. काही जण फोन ओव्हनमध्ये वाळवतात तर काही हीटरवर फोन ठेवतात. पण या पद्धतीने तुमचा फोन खराब होऊ शकतो.
जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला तर काळजी करु नका. भिजलेला मोबाईल फोन वाळवण्याच्या पाच सोप्या टिप्स देत आहोत, जेणेकरुन तुमचा फोन खराब होणार नाही.
1. जर मोबाईल फोन भिजला असेल तर तातडीने त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.
2. फोनच्या अक्ससरीज वेगळं केल्यानंतर फोनचे इतर पार्ट्स वाळवणं गरजेचं आहे. यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

3. भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांड सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

4. तांदळाच्या भांड्यात मोबाईल ठेवायचा नसेल तर सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

5. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
हे करणं टाळा:

ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
Joshi.m.b
ता.शेवगाव जि.अहमदनगर
🎲🎲🎲🎲Ⓜ🅰🅿🎲🎲🎲🎲

Friday 18 March 2016

सवांनी
वाचावीत अशी संग्राह्य पुस्तके

०१.) एक होता कारव्हर = वीणा गवाणकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) ययाती = वि. स. खांडेकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युनजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८७.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८८.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
८९.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९०.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९१.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९२.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९३.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९४.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९५.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९६.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९७.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९८.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
९९.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे
१००.) चकित करणारे गणिते = श्याम मराठे
१०१.) अब्यकस = रवींद्र पुरी
१०२.) तंत्र गणिताचे भाग – १ = रवींद्र पुरी
१०३.) तंत्र गणिताचे भाग -२ = रवींद्र पुरी
१०४.) बहुविध कोडी = रमेश काणकोणकर
१०५.) गणितातील कयास खरे व चुकलेले = डॉ. व.ग. टिकेकर
१०६.) गमतीदार विज्ञान = निरंजन घाटे

Monday 14 March 2016

पसायदान अर्थ

पसायदानाचा अर्थ…
प सा य दा न

आता विश्वात्मके देवे |
येणे वागज्ञे तोषावे |
तोषोनि मज द्यावे पसायदान हे |

आता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो सर्व धर्मातीत देव त्याला विनंती करत आहेत कि त्याने ह्या वांग्मय यज्ञाने प्रसन्ना व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे. सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव्हे आपणच सर्व विश्व जो बनला आहे अशा अत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाना त्यांनी विश्वात्मक हि उपाधी दिली आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वांग्मय यज्ञ आहे असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरुनी प्रसाद द्यावा असे ते म्हणतात…

जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो |
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे |

जे चा संबंध मागच्या ओवीशी आहे. मला या प्रसादाचे दान द्या कि, असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे…
खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो असे झाले म्हणजे कोणाशी त्याचे शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात…

दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात|

दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.
पाप म्हणजे काय?
सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तम च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.

वर्षत सकल मंगली |
ईश्वर निष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडली | भेटतु या भूता  |

या पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरवून मुक्त झालेला असतो, पण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. याकरता श्रीकृष्णांनी स्वत:चे उदाहरण दिले आहे. गीतेची हीच शिकवण आहे समाजातील सर्वांचेच आचरण शुध्द झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे.

चला कल्पतरूंचे आरव |
चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषांचे |

ईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे झाड. पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेतच, शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चिंताल ते देणारा दगड. संतही जे चिंताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह आहेत.
अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते साऱ्या समाजाला अमर करू शकतात.

चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
तेसर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु |

येथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे . जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.

किंबहुना सर्वसुखी |
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी |
भजिजो आदिपुरुषी | अखंडित |

स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात. दुष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्राचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत. आदिपुरुष म्हणजे परमात्मा. जो हे जाणतो कि परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी स्वकर्म -कुसुमानि. हेच त्याचे भजन होय.

आणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकीं इये |
दृष्ठादृष्ठविजयें | होआवें जी |

आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजय मिळोत. गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वाना पोहोचण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले, तर या जीवनात म्हणजे दृष्ठ आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. जीवनात आणि जीवनोत्तर नैतिकतेने विजयी होणे ह्याला भारतीय तत्वज्ञान जे महत्व देते तेच त्याचे वेगळेपण आहे.

तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो |
हा होईल दान पसावो |
येणे वरे ज्ञान देओ | सुखिया झाला |

तेंव्हा विश्वाचे राजे म्हणले “या प्रसादाचे दान मिळेल.” या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधिले आहे. ते म्हणाले कि ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या इतकी सर्वां पर्यंत पोहोचो की जग सुखमय होवो. श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर ते सुखी होतील हे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण होवो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला.

इदं न मम

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।